Why Should You Read This Summary?
पुस्तकाबद्दल:
1930 मध्ये जेव्हा भगतसिंग लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये बंद होते तेव्हा त्यांनी हा निबंध लिहिला. ते स्वतः नास्तिक होते म्हणजेच जो देवावर विश्वास ठेवत नाही. आणि याच गोष्टीमुळे त्यांचे मित्र त्यांना गर्विष्ठ म्हणू लागले होते.
ते भगतसिंग ला नास्तिक यामुळे म्हणत होते कारण त्यांच्या मते भगतसिंह हे फार अहंकारी आणि गर्विष्ट आहेत. पण भगतसिंग या गोष्टीशी पूर्णतः असहमत होते. या निबंधात त्यांनी सांगितले आहे की नास्तिक होणे म्हणजे गर्विष्ट असणे असं नाही.
या निबंधात किंवा पुस्तकात तुम्ही त्यांच्या स्वतंत्र विचार आणि प्रिन्सिपल्स बद्दल जाणून घेऊ शकता. या पुस्तकात त्यांनी देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना काही प्रश्न देखील विचारले आहेत.
ही बुक समरी कोणी वाचायला पाहिजे?
त्या प्रत्येक भारतीयाने ज्याला भगतसिंग यांचे विचार जाणून घेण्याची इच्छा आहे.
या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
भगतसिंग हे भारताचे एक महान स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांनी मृत्यू चा सामना मोठ्या हिमतीने केला, ते मृत्यूला घाबरले नाही, ते आनंदी होते की त्यांनी त्यांचे पूर्ण जीवन भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि लोकांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लावले. 1931 मध्ये या महान क्रांतिकारकाला फाशी देण्यात आली. तेव्हा ते फक्त तेवीस वर्षांचे होते.